सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण येथे राज्यस्तरीय संविधान गुणगौरव परीक्षा संपन्न.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण येथे ही परीक्षा सुजाण नागरिक मंच स्थापित संविधान गुणगौरव समिती द्वारा आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव परीक्षा घेण्यात आली यामध्ये लहान गट. मध्यम गट .आणि मोठा गट,ह्याचा समावेश केला गेला होता ह्या मध्ये विद्याधी आणि पालक मंच ह्यांनी सर्वांनी परीक्षा दिली गेली व समावेश होता
तर ही परीक्षा मार्गदर्शक नूरखा पठाण व बनसोडे मॅडम, रजिया शेख यांनी केले व या परीक्षेसाठी इमरान सैय्यद ,मारुती टकले ,हीना सय्यद ,मोरे सर,आणि इतर पालक वर्ग व विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.
संविधान गुणगौरव म्हणजे भारतीय राज्यघटनेचे महत्त्व आणि तिच्याबद्दल आदर व्यक्त करणे होय. हे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यांसारख्या संविधानाच्या मूल्यांचा गौरव करते आणि नागरिकांना आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्यासाठी प्रोत्साहित करते. या उपक्रमात संविधान दिन (२६ नोव्हेंबर) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) यांसारख्या महत्त्वाच्या दिवसांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
संविधानाचे महत्त्व म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ संविधान हे भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. हे देशाचे शासन कसे चालवायचे यासाठी नियम आणि आदर्श प्रदान करते.
संविधान सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार देते, जसे की समानतेचा अधिकार, भाषण स्वातंत्र्य आणि शोषणापासून संरक्षण, संविधानाचे जनक डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
राष्ट्र उभारणी १९४९ मध्ये स्वीकारलेली आणि १९५० मध्ये लागू झालेली राज्यघटना देशाला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदलांमधून मार्गदर्शन करते.
'संविधान गौरव महोत्सव' आणि परीक्षा: महाराष्ट्र शासन, उच्च शिक्षण विभाग आणि अनेक संस्था 'संविधान गौरव महोत्सव' आणि परीक्षांचे आयोजन करतात. याच अनुषंगाने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण यांनी संविधानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्याचे आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले गेले तसेच या राज्यस्तरीय संविधान गुणगौरव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व प्राप्त व्हावे म्हणून ही परिक्षा घेण्यात आली.

Post a Comment
0 Comments