Type Here to Get Search Results !

लोणंद पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण संपन्न!

 

लोणंद पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण संपन्न! 

फलटण/वैभव जगताप 


ग्रामसुरक्षा यंत्रणा अंतर्गत चोरी दरोडयाच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद, ग्रामसभा, सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळणार - मा. पोलीस अधिक्षक श्री समीर शेख सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांचा संयुक्त उपक्रम, जिल्हयात होणार ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत मा. जिल्हा पोलीस अधिक्षक मा. श्री समीर शेख, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खिलारी यांच्या प्रयत्नातुन व संयुक्त विदयमान ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत आज दि.26.10.2023 रोजी लोणंद पोलीस स्टेशन येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेचे 18002703600, 9822112281


प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास मा. पोलीस अधिक्षक श्री समीर शेख हे व्हीसीव्दारे, मा. श्री सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक लोणंद पोलीस ठाणे, श्री गणेश लोकरे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्रामसुरक्षा यंत्रणा, श्री सतिश शिंदे संपर्क अधिकारी ग्रामसुरक्षा यंत्रणा, श्रीमती स्वाती पवार पोलीस उपनिरीक्षक, श्री विशाल कदम पोलीस उपनिरीक्षक लोणंद पोलीस ठाणे यांचेसह लोणंद पोलीस स्टेशनचे अंमलदार, हददीतीलनागरिक पोलीसपाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार बांधव, आशासेविका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान उपस्थित नागरिकांना मा. पोलीस अधिक्षक श्री समीर शेख साहेब यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे ग्रामसुरक्षा यंत्रणेची माहिती समजावुन सांगुन त्याचे समाजास होणा-या उपयुक्ततेबाबत मार्गदर्शन केले.


लोणंद पोलीस स्टेशन हददीत संकटकाळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्रि नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरुपात तात्काळ ऐकवायला जाणार असल्याने गुन्हयांना आळा घालणे शक्य होणारआहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री डी के गोराडे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले.लोणंद पोलीस स्टेशन हददीतील गावातील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन मा. श्री सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक लोणंद पोलीस ठाणे यांनी केले.


ग्रामसुरक्षा यंत्रणा पोलीस ठाणे हददीत कार्यान्वीत करण्यासाठी 50 रुपये प्रतिकुटुंब प्रतिवर्षी इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतुद करणेबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडुन ग्रामपंचायतीना देण्यात आलेले आहेत.

गेल्या 13 वर्षात पुणे,सोलापुर, अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्यातील 5500हुन अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्रामसुरक्षा यंत्रणेत सहभागी झालेली आहेत. ग्रामस्थ आपआपले मोबाईल नंबर नोंदवुन यंत्रणा वापरत आहेत. संपुर्ण भारतासाठी टोल फ्रि नंबर

18002703600/9822112281 वर नोंदणी केलेल्या नागरीकांनी आपत्ती काळात फोन केल्यास त्याचाआवाज परिसरातील हजारो नागरीकांना त्वरीत मोबाईलवर ऐकु जातो परिसरातील नागरीकांना घटना घडत असतांना घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.ग्रामसुरक्षा यंत्रणेची उदिष्ठ घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे. गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरिक/ग्रामस्थांना एकाचवेळी कळवणे. अफवांना आळा घालणे.प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे शक्य, पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखणेकामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.

ग्रामसुरक्षा यंत्रणेची वैशिष्टे संपुर्ण स्वयंमचलीत यंत्रणा, गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत संपुर्ण भारतासाठी एकच टोल फ्रि नंबर 18002703600/9822112281 यंत्रणेत सहभागी असणारा कोणताही नागरीक आपत्ती काळात संपुर्ण परिसराला सावध करु शकतो, संदेश देणा-या व्यक्तीचा आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरीकांना मिळतो. दुर्घटनेचे स्वरुप,तिव्रता,ठिकाण कळल्याने गावक-यांना विनाविलंब व नियोजनबध्द मदत करता येते नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंमचलीत रित्या प्रसारीत होतात. नियमाबाहेर दिलेले संदेश / अपुर्ण संदेश रदद होतात व प्रसारीत होत नाहीत. एका गावात चोरी करुन चोर दुस-या गावाच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य होते वाहन चोरीचा संदेश आजुबाजुच्या 10 किमी परीसरातील सर्व दिशांच्या गावांना तात्काळ मिळतो. घटनेच्या तिव्रतेनुसार कॉल रिसीव् होत नाही तो पर्यंत रिंग वाजत राहते. संदेश पुढील एक तास पुंन्हा पुन्हा ऐकण्याची सोय, कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय, चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप ब्लॅक लिस्ट होतात. गावा बाहेर दुस-या गावात अपघात ग्रस्त नागरीकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारीत होतात. सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपआपल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांना किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचा-यांना सुचना/संदेश / आदेश देता येतो.

वरील प्रमाणे ग्रामसुरक्षा यंत्राणेची माहिती देण्यात आली सदर वेळी लोणंद पोलीस ठाणे हददीतील 350 ते400 नागरीक हजर होते.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -८००७८५२१२१



Post a Comment

0 Comments